अदभूत / Wonderful
- ME Holistic Centre
- May 10
- 10 min read
मानवी शरीर एक यंत्र आहे असे मानले जाते कारण मानवी शरीराची रचना ही अत्यंत गुंतागुंतीची आणि जटील आहे. पण त्याचबरोबर मानवी शरीर हे अत्यंत कार्यक्षम आहे. सद्गुरु म्हणतात, "या शरीराची रचना अत्यंत गुंतागुंतीची असली तरी यात कुठेही गुंतागुंत नाही. शरीराचे कार्य हे अत्यंत व्यवस्थित पद्धतशीरपणे व नैसर्गिक रित्या निसर्ग नियमांना अनुसरून चाललेले असते".
म्हणूनच सद्गुरु म्हणतात, *शरीर साक्षात*
*परमेश्वर.*
मानवी शरीरात भौतिकशास्त्रा प्रमाणे यांत्रिक, रासायनिक आणि विद्युत प्रक्रिया सतत चाललेल्या असतात. यामुळे शरीरात अनेक क्रिया घडून येत असतात. जसे की, हृदय एका पंपा सारखे कार्य करते, तर मेंदू माहितीवर प्रक्रिया करत असतो, तर स्नायू आणि सांधे हे मोटार प्रमाणे कार्य करत असतात, तर चयापचय ची क्रिया अनेक रासायनिक प्रक्रियां द्वारे होते.
मात्र मानवी शरीरातील या सर्व प्रक्रियांना प्रेरणा मिळत असते ती मानवी मनाकडून म्हणजेच विचारांकडून, भावभावना आणि शरीरांतर्गत व बाह्य वातावरणाकडून. यामुळे भौतिक यंत्र आणि मानवी शरीर यंत्र यात सखोल आणि मूलभूत फरक आहे.
१. यंत्राला प्रोग्रामिंग करावे लागते तर मानव हा स्वानुभवातून शिकतो, आणि मानव हा संवेदनशील असतो. यंत्राला कोणत्याही संवेदना नसतात. मानवाला विचार करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची आणि भावनिक प्रतिक्रिया देण्याची क्षमता असते जी कोणत्याही यंत्राला असणे शक्य नाही.
२. यंत्र सूचनांचे पालन करते परंतु मानव सर्जनशील असतो. मानव कल्पना शक्तीने नवनवीन विचार निर्माण करतो.
३. यंत्र नादुरुस्त झाले तर त्याला कोणीतरी दुरुस्त करावे लागते, पण मानवी शरीर स्वतः स्वतःची दुरुस्ती करत असते. जन्म, वाढ आणि नैसर्गिक बदल हा मानवाच्या नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे जे यंत्रात संभवत नाही.
४. यंत्राला कोणताही नैतिक किंवा सामाजिक दृष्टिकोन नसतो. यंत्राचे निर्णय हे पूर्वनियोजित असतात. मानव मात्र सद्सदविवेक बुद्धीने चांगले वाईट यात फरक करू शकतो आणि सामाजिक सहकार्याच्या भावनेतून निर्णय घेतो.
५. यंत्राला जन्म, मृत्यू आणि भावना नसतात. मानव स्वतःला जाणून घेऊन जीवनाचा अर्थ शोधू शकतो आणि व्यक्तिगत तसेच सामाजिक परिवर्तन घडवू शकतो.
यावरून हे सिद्ध होते की, मानवी शरीर हे केवळ एक यंत्र नाही तर संवेदनशील आणि परिवर्तनक्षम अस्तित्व आहे.
मात्र... ...
आजचे मानवी जीवन बघितले तर आपल्या काय लक्षात येते? तर, मानवी जीवन आज यांत्रिक म्हणजेच यंत्रवत झालेले आहे वास्तविक पाहता मानवी जीवन हे मेकॅनिकल नाही तर मॅग्नेटिक म्हणजे प्रभावशाली, संवेदनशील व आकर्षणात्मक असावयास हवे.
*माणूस आज यंत्रवत*
*कां झाला आहे ?*
कारण मानवी जीवन प्रभावशाली, संवेदनशील व आकर्षणात्मक होण्यासाठी मानवी जीवनात जे नवरस निर्माण होतात जे मानवी भावनांचे प्रगटीकरण असतात त्या नवरसांचा अभाव आजच्या जीवनशैलीत आढळून येतो.
नवरस हे मानवी जीवनाचा आत्मा आहेत. नवरसांचा अभाव म्हणजे भावनांचा अभाव, भावनांचा अभाव म्हणजे कोरडे यांत्रिक अस्तित्व, कदाचित अत्यंत कार्यक्षम पण आत्मविहीन. मानवाची खरी ओळख ही त्याच्या भावनांमुळे होते. मानवी जीवनातील अनुभवातून उमलणाऱ्या संवेदनांमध्ये मानवी अस्तित्वाची ओळख आहे. नवरस हे जीवनात रंग म्हणजे रंगत आणतात, जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात आणि जीवन गतिमान बनवतात. *नवरसांचे प्रगटीकरण*
*हा चैतन्याचा*
*अविष्कार*
*आहे.*
हे नवरस कोणते आहेत?
हे नऊ रस म्हणजे:
१. *श्रृंगार* : प्रेम आणि
सौंदर्य.
२. *हास्य* : आनंद
विनोद
३. *करुणा*: दया,
सहानुभूती.
४. *रौद्र* : क्रोध आणि
संताप
५. *वीर*: शौर्य आणि
साहस
६. *भयानक*: भीती,
सावधानता.
७. *बीभत्स* : घृणा,
तिरस्कार.
८. *अद्भुत* : आश्चर्य
आणि विस्मय.
९. *शांत* : समाधान
आणि अंतर्गत
शांती.
मानवी जीवनाच्या समृद्धी करता मानवी जीवनात नवरसांचे प्रगटीकरण होणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. नवरस प्रगटीकरण हे आपल्या भावनात्मक आणि मानसिक समृद्धीचे प्रतिबिंब आहेत. मानवी जीवनात भावना या महत्त्वाच्या आहेत, कारण भावना या शरीराला कार्य करण्याच्या प्रेरणा आहेत. या भावनांच्या प्रगटीकरणास वाव मिळाला नाही तर अनेक प्रकारच्या मानसिक व शारीरिक आजारांचा प्रादुर्भाव होतो. मानवी भावना आणि शरीरांतर्गत रासायनिक प्रक्रिया यांचा घनिष्ठ संबंध आहे. आपल्या भावनांचा प्रभाव हा आपल्या मेंदूतील
न्यूरोट्रान्समीटर आणि हार्मोन्स वर होतो, जे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. शरीराच्या वाढीस, शरीर सुदृढ, निरोगी राहण्यास आवश्यक असलेल्या अनेक हार्मोन्सची निर्मिती व स्त्रवणे हे भावनांशी निगडित असते.
या सर्व गोष्टींचा सूक्ष्मपणे विचार करून आमच्या पूर्वजांनी आमच्या जीवनात सणांची, उत्सवांची व कौटुंबिक परंपरांची रचना केलेली होती. या सणांच्या, उत्सवांच्या माध्यमातून आमच्यातील भावनांना- नवरसांना प्रगटीकरणास वाव मिळत असे. आजच्या या धावपळीच्या युगात आम्हाला सण, उत्सव खऱ्या अर्थाने साजरे करण्यास वेळच मिळत नाही. आज आमच्या जीवनात नवरसांचा अभाव आढळतो त्याची प्रमुख कारणे म्हणजे:
१. तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाचा प्रभाव : डिजिटल क्रांतीमुळे व तंत्रज्ञानाच्या अफाट वापरामुळे मानवी संवाद कमी होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र मानवाच्या वाढत्या वापरामुळे भावनिक अभिव्यक्ती कमी होत आहेत.
२. जलद वेगवान जीवनशैली आणि स्पर्धात्मक वातावरण: आधुनिक जीवनशैली अत्यंत गतिमान आणि स्पर्धात्मक झालेली आहे. सगळेजण सतत धावपळ करत असतात त्यामुळे भावनिक रसांची अनुभूती घेण्यास वेळच मिळत नाही.
३. सांस्कृतिक बदल आणि
आधुनिकीकरण:
पारंपारिक कला,
साहित्य आणि
नाट्यशास्त्र यांचा
प्रभाव कमी होत
आहे, त्यामुळे
नवरसांचे प्रगटीकरण
पूर्वी इतके प्रभावी होत
नाही.
४. मानसिक ताण तणाव आणि नैराश्य: वाढत्या मानसिक ताणतणावामुळे लोक भावनिक दृष्ट्या अधिक संवेदनशील होत आहेत पण त्याच वेळी भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्याच्या संधी कमी होत आहेत.
५. सामाजिक आणि कौटुंबिक नात्यांमधील बदल: पूर्वीच्या काळात कुटुंबातील सदस्य एकत्र राहत असत. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे भावनिक संवाद अधिक सशक्त होता.आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे भावनिक अभिव्यक्ती कमी होत आहे आज कुटुंबात माणसेच नसतात. हम दो- हमारे दो,यावरून हम दो हमारा एक, आणि आता तर काहीजण हम दो-हम हि दो यावर आले आहेत. कुटुंब संस्था आज धोक्यात आली आहे.
आज खरोखरच या सर्व गोष्टींचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, कारण आमच्या जीवनात नवरस नसतील तर आमचे जीवन हे अत्यंत रुक्ष, एकसुरी आणि यंत्रवत होईल.
सद्गुरु म्हणतात,
*"जीवन हे एक संगीत*
*आहे,जीवन हा संगीत*
*प्रवाह आहे, ज्यात*
*विविध भाव आहेत"* आणि जर हे भावच नष्ट झाले तर आमचे जीवन संगीत बेसूर होईल आणि मानव हा केवळ अस्तित्वाच्या पातळीवर जगणारा एक भावनाशून्य जीव बनून राहील. असा मानव हा केवळ एक यंत्र म्हणून अस्तित्वात राहील.
आज आपण नवरसांपैकी अद्भुत रसाची ओळख करून घेणार आहोत.
सद्गुरु श्री वामनराव पै शिक्षणाची व्याख्या करतांना म्हणतात,
*क्षणाक्षणाला शिकणे*
*या नाव शिक्षण.*
क्षणाक्षणाला शिकणे ही गोष्ट वाटते तेवढी सोपी मात्र नाही. बघा नां, आपण खरोखर क्षणाक्षणाला शिकत असतो कां? तर, नाही. सद्गुरूंची ही शिक्षणाची संकल्पना म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा शोध घेत घेत एक जिवंत जीवन प्रवासच आहे.*देवाचिया द्वारी उभा क्षणभरी.* वास्तविक पाहता ज्ञानप्राप्ती ही स्थिर संकल्पना नसून ज्ञान हा सतत प्रवाहित होणारा अनुभव आहे. आपल्या मनात जिज्ञासा असेल तरच जीवनाच्या प्रत्येक अनुभवातून आपण शिकू शकतो.
अद्भुत रस आणि शिकण्याची प्रक्रिया यांचा खूप जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण विस्मय आणि आश्चर्य अनुभवतो तेव्हा आपली जिज्ञासा जागृत होते. हेच आश्चर्य आपल्याला नवीन प्रश्न विचारायला प्रवृत्त करते, आणि त्या उत्तरांचा शोध घेत असताना ज्ञानाची नवीन दालने आपल्यासमोर उघडली जातात. विस्मय आणि जिज्ञासा यांचे संमेलन म्हणजे नवीन शोधाची सुरुवात होय.
खालील कथा लक्षपूर्वक वाचा आणि मनन चिंतन करा.
ही गोष्ट आहे १९४५ ची. अभियंता *पर्सी स्पेन्सर* नेहमीप्रमाणे रेथीयाॅन कंपनीत रडार सेटवर प्रयोग करत असतात. ते मॅग्नेट्रॉन नावाच्या उपकरणावर संशोधन करत होते. हे उपकरण रडार सिग्नल तयार करण्यासाठी वापरले जाते. एका प्रयोगाच्या वेळी त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या खिशातील चॉकलेट वितळले आहे. बहुतेकांनी कदाचित यावर चिडचिड केली असती. पॅन्ट धुऊन टाकली असती आणि ही घटना विसरून गेले असते. पण...
ही अद्भुत घटना बघून स्पेन्सर यांना आश्चर्य वाटले. हे असे कसे घडले? त्यांची जिज्ञासा जागृत झाली, त्यांनी अधिक प्रयोग करण्याचे ठरविले. त्यांनी दुसऱ्या दिवशी मॅग्नेट्रॉन च्या जवळ पॉपकॉर्न चे दाणे ठेवले आणि काय आश्चर्य त्या दाण्यांचे त्वरित लाह्यांमध्ये-पॉपकॉर्न मध्ये रूपांतर झाले. नंतर त्यांनी अंड्याचा वापर केला. आणि हो, तुमचा अंदाज बरोबर आहे... अंड अचानक फुटले. पर्सींना आश्चर्य मिश्रित आनंद झाला. त्यांच्या लक्षात आले की मॅग्नेट्रॉन मधून निघणाऱ्या उर्जेने अन्न गरम करता येईल आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पहिल्या मायक्रोवेव्ह ओव्हन चा जन्म झाला. ज्याला रडाररेंज असे नाव देण्यात आले.
एक साधीशी घटना ज्याकडे सर्वसामान्य माणसांनी एक अपघात म्हणून बघितले असते, पण या अद्भुत घटनेचे स्पेन्सर यांना आश्चर्य वाटले, त्यांची जिज्ञासा जागृत झाली आणि त्यांच्या प्रयोगशीलतेतून एक स्वयंपाकाचे नवीन तंत्रज्ञान जन्मास आले, ज्याचा आज जगभरात वापर केला जात आहे. एका वितळलेल्या चॉकलेट बारमुळे एक कोट्यावधीची उद्योग साखळी निर्माण झाली. हे सर्व घडले ते केवळ एका व्यक्तीच्या वेगळ्या दृष्टिकोनामुळे.
खरी गोम शोधात नाही तर घटनेकडे लक्ष देण्यात आहे. पाहण्यात आहे. जाणीवपूर्वक पाहण्यात आहे. आपण बघणे आणि पाहणे याच्यातील फरक यापूर्वीच्या एका लेखात बघितला आहे. आपल्या आजूबाजूला दररोज वितळणाऱ्या चॉकलेट बार सारख्या घटना घडत असतात पण आपण खूप व्यस्त आणि विचलित असतो. आपण वेगळा विचार करतच नाही, कारण आपल्याला अद्भुततेची जाणीवच होत नाही.आपल्या भावनाच बोथट झाल्या आहेत. आपल्याकडे सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या गोष्टींची दखल घेण्यासाठी वेळच नसतो.
मग... ...
तुम्ही कोणीही असा शिक्षक, व्यावसायिक, कलाकार, नोकरदार किंवा निवृत्त व्यक्ती, तुम्ही जर तुमच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करण्याची कला अवगत केली तर तुम्ही अचंबित करणाऱ्या नव्या संधींची द्वारे उडू शकाल.
यासाठी काय केले पाहिजे? तर तुम्ही तुमची पाहण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. याचा अर्थ मी तुम्हाला अति जागरूक होण्यास किंवा पाहण्याचे काहीही चुकवू नका असे सांगत नाहीये, उलट मी याच्या विरुद्धच आहे.
मी तुम्हाला येथे एक अनोखी पद्धत जी अत्यंत प्रभावी ठरू शकेल-
*प्रयत्न न करता*
*जागरूकता*
*(effortless awareness)* सांगू इच्छितो. या एफर्टलेस अवेअरनेसचा सराव करा. ही पद्धत म्हणजे तुमची जागरूकता सहजपणे प्रवाहित होण्यासाठी तुमच्या दिवसातील काही वेळ काढणे होय. हे म्हणजे जिज्ञासेची प्रेरणा प्रवाहित होण्यासाठी मनाची द्वारे उघडणे होय.
*हे कसे करावयाचे ?*
प्रयत्न न करता जागरूकता प्रवाहित व्हावी यासाठी दिवसातील १० मिनिटांचा वेळ काढा. ज्याला आपण *जागरूकतेचा प्रवास* *awareness walk*
म्हणू यात.
या दहा मिनिटाच्या काळात तुम्हाला कोणत्याही समस्येचा, प्रश्नाचा विचार करावयाचा नाही किंवा कोणतीही कल्पना करावयाची नाही तर फक्त आणि फक्त निरीक्षण करावयाचे आहे. एखादे फुल, पान, झाड, जमीनीला पडलेल्या भेगा, आकाशातील पक्षी, चालण्याचा आवाज, तुमच्या शरीराला स्पर्श करणारी वाऱ्याची झुळूक, अथवा बोचरी थंडी याचा केवळ अनुभव घ्यायचा आहे, कोणतेही विश्लेषण न करता, कोणताही निष्कर्ष न काढता.केवळ जाणिवेचा अनुभव. केवळ पाहणे. हा जागरूकतेचा प्रवास म्हणजे हरिपाठत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसे,
*उगा राहे निवांत*
*शिणसी वाया.*
या १० मिनिटांच्या जागरूकतेच्या चालीत तुम्ही काय करत आहात, तर तुम्ही तुमच्या मेंदूला तुमच्या आजूबाजूच्या जगासाठी अधिक ग्रहणक्षम बनवण्याचा सराव करत आहात. तुम्ही तुमच्या सर्जनशीलते साठी सुपीक जमीन तयार करत आहात. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की या सरावाचे परिणाम आश्चर्यकारक असतात. या सरावाने तुम्हाला अडथळ्यांमध्ये संधी दृष्टीस येतील. हे शिकणे हे खरे शिक्षणाचे सामर्थ्य आहे. याला मनाचे बागकाम समजा. तुम्ही एका कळीला जबरदस्तीने फुलवू शकत नाही पण तुम्ही त्या कळीला फुलण्यासाठी योग्य वातावरण, योग्य परिस्थिती निर्माण करू शकता. तुमची सर्जनशीलता हीच ती कळी आहे. प्रयत्न न करता जागरूकता हे त्या कळीला फुलण्यासाठी आदर्श वातावरण तयार करणे आहे.
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचे, घटनेचे फक्त निरीक्षण करतो, काहीही बदलण्याचा प्रयत्न न करता तेव्हा आपण आपल्या भोवतीच्या प्रत्येक गोष्टीला त्या गोष्टीचे खरे सौंदर्य आणि संभाव्यता दर्शविण्याची मुभा देत असतो.
आपला सहकारी, पार्टनर ज्याच्याशी जुळवून घेणे आपल्याला अवघड जात आहे त्याच्याकडे कोणताही पूर्वग्रह न ठेवता पाहण्याचा प्रयत्न करा. जी समस्या तुम्हाला जुळवून घेण्यासाठी अवघड वाटत असेल त्या समस्येकडे ती समस्या लगेच सोडविण्याचा विचार न करता नवीन दृष्टीने पहा. तुमचे छंद जे जोपासायला तुम्हाला आवडतात पण ज्यास तुम्ही वेळ देऊ शकत नाही त्या छंदांचा असंतोषाने नव्हे तर कुतुहलाने विचार करा.
जागरूकता म्हणजे जाणीव ही काही जबरदस्तीने प्राप्त करण्याची गोष्ट नाही तर ती सहज प्रवाहित होते. मात्र त्यासाठी जाणीवपूर्वक वेळ देणे आवश्यक आहे.
पर्सी स्पेन्सरला आठवा. त्याने काही विचारपूर्वक स्वयंपाकाच्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला नाही, त्याने फक्त एक अद्भुत गोष्ट पाहिली त्याचे त्याला आश्चर्य वाटले, त्याची जिज्ञासा जागृत झाली आणि त्याने तिचा पाठपुरावा केला.
*म्हणून हे आव्हान*
*स्वीकारा.*
पुढील आठवड्यात प्रयत्न न करता असणारी जागरूकता यासाठी रोज १० मिनिटांचा सराव करा. तुमच्या जीवनाकडे, तुमच्या सवयींकडे, तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाकडे नवीन दृष्टीने पहा.
*सर्वसामान्यातील*
*असामान्य गोष्टी*
*शोधण्याच्या तुमच्या*
*या प्रवासाला*
*मनःपूर्वक*
*शुभेच्छा !!!*
धन्यवाद.
सद्गुरु नाथ महाराज की जय
JayantJoshi
Jeevanvidya Mission
.......
Wonderful
The human body is often considered a machine due to its extremely complex and intricate structure. Yet at the same time, it is incredibly efficient. As Sadhguru says, "Even though the design of the body is intricate, there is no confusion or chaos within it. The body functions in a systematic, orderly manner, naturally in accordance with the laws of nature."
That's why Sadhguru says, "The body is God incarnate."
According to physics, the human body is constantly undergoing mechanical, chemical, and electrical processes. These processes result in various functions within the body. For example, the heart works like a pump, the brain processes information, the muscles and joints work like motors, and metabolism occurs through complex chemical reactions.
However, what drives all these processes in the human body is the human mind—that is, thoughts, emotions, and the internal and external environment. This is what fundamentally separates a mechanical device from the human machine.
1. A machine must be programmed, while a human learns from experience and is sensitive. Machines do not feel, while humans possess the ability to think, introspect, and express emotions—capabilities no machine can possess.
2. Machines follow commands, but humans are creative. They generate new thoughts through imagination.
3. If a machine breaks down, it needs someone to repair it, but the human body can repair itself. Birth, growth, and natural changes are part of the natural human process, which is not possible in machines.
4. Machines have no moral or social perspectives. Their decisions are pre-programmed. Humans, on the other hand, can distinguish right from wrong through conscience and make decisions based on a sense of social cooperation.
5. Machines have no birth, death, or emotions. Humans can explore themselves, find the meaning of life, and initiate personal and social transformation.
This proves that the human body is not merely a machine, but a sensitive and transformative existence.
But… Looking at human life today, what do we notice? That human life has become mechanical—robotic, in fact. When in reality, human life should not be mechanical but magnetic—influential, sensitive, and full of attraction.
Why has man become machine-like today?
Because the essential emotional expressions known as Navarasas (the nine sentiments), which enrich human life and represent the spectrum of human emotions, are missing in today’s lifestyle.
Navarasas are the soul of human life. Without them, emotions vanish, and without emotions, life becomes dry and mechanical—possibly efficient, but without a soul. True human identity lies in emotions. In the emotions that bloom from life experiences, we discover the essence of our humanity. Navarasas add color and vitality to life. They bring meaning and motion to existence. The expression of Navarasas is a manifestation of consciousness.
What are these Navarasas (Nine Emotions)?
1. Shringar – Love and Beauty
2. Hasya – Joy and Humor
3. Karuna – Compassion and Sympathy
4. Raudra – Anger and Rage
5. Veer – Courage and Valor
6. Bhayanak – Fear and Caution
7. Bibhatsa – Disgust and Aversion
8. Adbhut – Wonder and Amazement
9. Shanta – Contentment and Inner Peace
To enrich human life, it is essential to express these Navarasas. Their expression is a reflection of emotional and mental well-being. Emotions are vital because they motivate physical action. When emotional expression is suppressed, it can lead to various mental and physical illnesses. Emotions are deeply linked to the body's internal chemical processes. Our emotions affect neurotransmitters and hormones in the brain, which in turn influence our physical and mental health. Hormones essential for growth and wellness are associated with emotional states.
Our ancestors, understanding these nuances, designed festivals, celebrations, and family traditions to allow for emotional expression—particularly of the Navarasas. However, in today’s fast-paced life, we no longer celebrate festivals with the same fervor, and so we see a lack of Navarasas in modern life. The main reasons for this decline are:
1. Technology and Mechanization – With the digital revolution and overuse of technology, human interactions have decreased. With increased use of AI and machines, emotional expression is fading.
2. Fast-Paced and Competitive Lifestyles – Modern life is so hectic and competitive that people don’t have time to experience emotional depth.
3. Cultural Shifts and Modernization – Traditional art, literature, and theatre—which once helped express these emotions—are losing their influence.
4. Mental Stress and Depression – Due to increasing stress, people are becoming more emotionally sensitive, yet they lack opportunities to express these emotions.
5. Changes in Social and Family Structures – In earlier times, joint families allowed for richer emotional communication. Today, with nuclear and even isolated families ("We two—our one", and now even "we two—we only two"), emotional expression has diminished. The very institution of the family is under threat.
Now is truly the time to re-evaluate all this, because without Navarasas, our life becomes dull, monotonous, and machine-like.
Sadhguru says:
"Life is music—
a flowing musical journey
with various emotions,"
and if these emotions disappear, life becomes out of tune. A human devoid of emotions becomes just an existence, a mechanical being—a machine.
Today, we are going to explore the rasa of Wonder – Adbhut Rasa.
While defining education, Sadhguru Shri Vamanrao Pai says:
"To learn every moment—
that is education."
But learning every moment isn’t as easy as it sounds. Just think—are we truly learning at every moment? The answer is usually no. Sadhguru's idea of education is a vibrant journey of life that involves exploring every moment.
"Even standing at God’s doorstep for a moment…"
In reality, knowledge is not a fixed idea but a continuously flowing experience. The true essence of learning lies in…
Yorumlar