अमावस्या – अंधारातून आत्मप्रकाशाकडे : एकदर्शनाची वाटचाल
- ME Holistic Centre
- Jul 29, 2025
- 2 min read
✍🏻 दर्श अमावस्या विशेष चिंतनलेख

“प्रकाश शोधायचा असेल,
तर अंधारातच जावं लागतं…
आणि जेव्हा आपण अंधारात उतरत जातो,
तेव्हाच अंतरंगात दीप उजळतो!”
🔶 साधकाने विचारलं…
एक दिवस एका साधकाने गुरूंना विचारलं –
“गुरुदेव, पौर्णिमा आम्हाला समजते – प्रकाश, उत्सव, सौंदर्य.
पण ही अमावस्या?
ही अंधाराची रात्र आपल्याला काय शिकवते?”
गुरु हसले. म्हणाले –
“पौर्णिमा बाहेरचा प्रकाश दाखवते…
पण अमावस्या?
ती आपल्या अंतरात लपलेलं दिव्यत्व जागं करत असते.”
🔶 *गैरसमजांचं झाकोळ – आणि त्यात हरवलेली अमावस्या*
आपल्या संस्कृतीत अमावास्येला ‘अशुभ’ मानण्याची पद्धत इतकी खोल रुतली आहे, की आजही अनेकजण या दिवशी:
• कुठलंच काम करत
नाहीत
• प्रवास टाळतात
• आणि काही जण
गटारी
अमावस्येसारख्या
विकृत कल्पनांत
अडकतात.
पण हा ‘काही करू नका’ असा आदेश नव्हता…
तो होता – ‘स्वतःशी संवाद साधा…’
‘बाहेर थांबा,आत वळा’
🔶 *प्रदर्शन विरुद्ध दर्शन*
आजच्या युगात प्रत्येकाला “प्रदर्शन” हवं आहे –
📸 Insta-post, 💬 WhatsApp-Status, 🎭 बाह्य प्रतिमा…
*पण दर्शन?*
खऱ्या अर्थानं स्वतःला समजून घेणं, दोषांशी नजरेला नजर देणं, मौनात उतरणं…
*प्रदर्शन सोपं आहे… दर्शन मात्र कष्टसाध्य.*
प्रदर्शनात प्रसिद्धी मिळते,
दर्शनात प्रामाणिकता लागते.
प्रदर्शन बाहेर घडतं,
पण दर्शन… ते फक्त आत घडतं.
🔶 *अमावस्येचं गूढ खगोलशास्त्र — आणि त्यात दडलंय आध्यात्म*
अमावास्येला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी सम पातळीवर येतात.
चंद्र सूर्याच्या प्रकाशात झाकोळतो — म्हणून आपल्याला बाहेर अंधार दिसतो.
पण…
जेव्हा जीवनात –
शरीर स्थिर,
मन शांत,
आत्मा जागरूक होतो…
तेव्हा या त्रयींच्या समपातळीवर येण्यानं
आत्मप्रकाश उजळतो – अनुभव म्हणून, शांती म्हणून, समाधान म्हणून.
🌑 *बाहेर अंधार असतो,*
*पण अंतरात प्रकाशाची उधळण होते.*
🔶 *संतांचे बोल – अंधार नाकारू नका, समजून घ्या*
संत म्हणतात:
*अंधारात ना पाहे ज्योती, तो का म्हणावा ज्ञानी?*
*अंतःकरण निर्मळ न करता, उपासना व्यर्थ होय.*
या संतवचनांमध्ये अमावस्येचा गाभा स्पष्ट आहे –
बाह्य अंधाराची भीती बाळगू नका,
तर अंतर्मनातील अंधार ओळखून त्यातून उर्जा प्रकट करून प्रसारित करा.
🔶 *आधीची परंपरा — सशक्त ज्ञानाचा वारसा*
• या दिवशी घरातले जुने
दिवे शोधून, स्वच्छ
करून दीपपूजन केलं
जाई
• घर बांधकामासाठीची
लाकूडतोड
अमावस्येच्या रात्रीच
होत असे – कारण
झाडात रससंचार
थांबलेला असे
• उपवास, मौन, ध्यान,
ग्रंथवाचन – ही
अमावस्येची खरी
उपासना होती
*आमच्या पूर्वजांनी अमावस्येला अधोगती नव्हे, शुद्धी आणि जाणीव यांचे पर्व मानले.*
🔶 *आज अमावस्येला काय कराव ?*
मौनात थांबा –
चंद्र नसतो,पण तुमचा आतला प्रकाश जागा होऊ शकतो.
✅ विश्व प्रार्थनेचा जप करा
✅ एक दीप स्वतःच्या
अंतरात लावा
✅ बाह्य आळस टाळा –
आंतरिक जागृती घडवा
✅ मनाला शांत करणारा
एखादा संकल्प करा
🔶 *गटारी की दर्श? आपण ठरवायचं…*
“गटारी अमावस्या” म्हणजे नशेचं सोंग, परंपरेचा विकृत अर्थ.
“दर्श अमावस्या” म्हणजे —
स्वतःकडे, आपल्या वागणुकीकडे, आपल्या दुर्बलतेकडे निर्भयपणे पाहण्याचा दिवस.
🪔 *अंधार नाकारू नका… त्यातून उगम होतो प्रकाशाचा*
“अमावस्या ही अशुभ नसते… ती स्वतःकडे वळण्याची संधी असते.”
ज्याला आपण अंधार समजतो…
तोच अंधार आपल्या अंतर्मनातील चंद्राला उजळवतो!”
दर्श अमावस्येच्या निमित्ताने एक चिंतन
जयंत जोशी.










Comments